महाराष्ट्र

तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून ६५ जणांची केली फसवणूक

Published by : Lokshahi News

तरुणांना सिक्युरिटी कंपनीमध्ये नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून आर्णी शहरातील १८ तर यवतमाळ मधील ४७ असे एकुण ६५ जणांना गंडा घातल्याचा प्रकार घडकीस आलाय. दरम्यान आर्णी आणि यवतमाळ येथील एकूण ६५ जणांची फसवणुक करून लाखो रूपयांचा चुना लावल्याची माहिती समोर आली आहे.

एस.आय. एस. सिक्युरिटी कंपनीमध्ये नोकरी लावून देण्यासाठी बेरोजगार तरूणांकडून पैसे उकळणाऱ्या प्रकाश उर्फ जगदीश राठोड याच्याविरुद्ध आर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. अजय दिगंबर ठाकरे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या कोरोनामुळे लाखो तरूण बेरोजगार असून ते नोकरीच्या शोधात आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा