महाराष्ट्र

SL vs IND T20 Final Live : श्रीलंकेसमोर ८२ धावांचं लक्ष्य

Published by : Lokshahi News

भारतानं श्रीलंकेसमोर विजयासाठी ८२ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. २० षटकात टीम इंडियाने ८ बाद ८१ धावा केल्या. त्यामुळे आता श्रीलंकेला विजयासाठी ८२ धावांचं माफक आव्हान मिळालं आहे.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. कर्णधार शिखर धवन बाद झाल्यानंतर काही धावांच्या अंतरावर एका पाठोपाठ एक अशा वरच्या आणि मधल्या फळीतील मातब्बर फलंदाज बाद झाले. अखेर २० षटकात टीम इंडियाने ८ बाद ८१ धावा केल्या. त्यामुळे आता श्रीलंकेला विजयासाठी ८२ धावांचं माफक आव्हान मिळालं आहे. भारताकडून कुलदीप यादव याने नाबाद 23 धावा केल्या. तर श्रीलंकेचा गोलंदाज वानिदू हसरंगा याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ कर्णधार दासुन शनाका याने दोन तर दुश्मंथा चमिरा, रमेश मेंडिस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा