महाराष्ट्र

बापरे! महिलांकडून पूजा करताना वडाच्या झाडाला लागली आग

वटपौर्णिमा पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणत साजरी करतात.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कोल्हापूर : वटपौर्णिमा पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणत साजरी करतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते, असे सांगितले जाते. आज राज्यभरात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. परंतु, कोल्हापूरात वटपौर्णिमा साजरी करताना वडाच्या झाडालाच आग लागल्याने खळबळ उडाली आहे.

अंबाबाई मंदिर परिसरात वटपौर्णिमेनिमित्त महिलांकडून पूजा सुरू असताना झाडाने अचानक पेट घेतला. यामुळे मंदिर परिसरातील यंत्रणेची एकच तारांबळ उडाली होती. कापूर आणि उदबत्ती पूजेनिमित्त बांधलेल्या दोऱ्याला लागल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निरोधक मशीनच्या सहाय्याने ही आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते