महाराष्ट्र

ह्रदय पिळवटून टाकणारी घटना! चार महिन्याचे बाळ वाहत्या पाण्यात पडले अन्...

लोकल थांबली म्हणून चालत जाणाऱ्या महिलेसोबतच्या व्यक्तीच्या हातातून 4 महिन्यांचं बाळ निसटलं. वाहत्या पाण्यात पडून बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्याण : मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावासाने हजेरी लावली आहे. यामुळे लोकल पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. अशातच, हदय पिळवटून टाकणारी एक बातमी समोर येत आहे. लोकल थांबली म्हणून चालत जाणाऱ्या एका महिलेच्या हातातून 4 महिन्यांचं बाळ निसटलं. आणि वाहत्या पाण्यात पडून बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

माहितीनुसार, अंबरनाथ रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने रवाना झालेली लोकल दुपारच्या सुमारास तब्बल दोन तास कल्याण आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान उभी होती. लोकल पुढे जात नसल्याने काही प्रवाशी लोकलमधून उतरुन चालत ट्रॅकच्या बाजूने जात होते. त्यात प्रवास करणारी महिला आणि तिच्यासोबत असलेला व्यक्ती ट्रेनमधून उतरून जात होते. तेव्हा महिलेसोबत असलेल्या पुरुषाच्या हातातून चार महिन्यांचं बाळ पाण्यात पडल्याने वाहून गेलं आहे. यावेळी बाळाच्या आईचा आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता.

ही घटना घडल्यानंतर उपस्थितांमधील काही तरुणांनी पाण्यात उड्या मारून मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळ मिळून न आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा