महाराष्ट्र

दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

राज्यभरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पा विराजमान झाले. परंतु, आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

विकास मिरांगे | मुंबई : राज्यभरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पा विराजमान झाले. परंतु, आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत आहे. काल आलेला गणपती आज जात आहे म्हणून अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर, अशी घोषणा देताना लहान मुलांसह मोठेही गलबलून जात आहेत.

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. त्याशिवाय, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्थांनीदेखील कृत्रिम तलावाद्वारे विसर्जनाची तयारी केली आहे. मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या वतीने विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे.

गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहू समुद्र किनाऱ्यांसह आरे कॉलनी इतर ठिकाणच्या तलावावर विसर्जनाची तयारी मुंबई महापालिकेने तयारी केली आहे. त्याशिवाय, विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने काही ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Crime News : चितेगावमध्ये मियाँभाईच्या खुनाची उकल; सहा आरोपींना पोलीस कोठडी

Birthday Celebration : ऑफिसमध्ये वाढदिवस साजरा करताय ? मग थांबा ! सरकारने काढला नवा नियम

S. Jaishankar On Donald Trump : भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीवरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे स्पष्ट विधान; ट्रम्प यांचा दावा पुन्हा फेटाळला

Cotton Market News : कापसाचा दर कमी होण्यासाठी शासन जबाबदार; नागपूर खंडपीठाचे सरकारवर कडक शब्दात ताशेरे