महाराष्ट्र

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

Published by : Lokshahi News

अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर देवगड फाट्याजवळ स्विफ्ट कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात असलेल्या ट्रॅव्हल बस (एमएच 19 वाय 7123) व औरंगाबादकडून नगरच्या दिशेनं जात असलेल्या स्विफ्ट कार (एमएच 21 बीएफ 7178) यांच्यामध्ये देवगड फाट्याजवळ भीषण अपघात झाला. यात ५ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृत जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात स्विफ्ट कार ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूस घुसल्यानं स्विफ्ट कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू केलं. जखमींना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा इथं हलवण्यात आलं आहे. सर्व पाचही जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. पुढील कार्यवाही नेवासा पोलीस करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?