महाराष्ट्र

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

Published by : Lokshahi News

अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर देवगड फाट्याजवळ स्विफ्ट कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात असलेल्या ट्रॅव्हल बस (एमएच 19 वाय 7123) व औरंगाबादकडून नगरच्या दिशेनं जात असलेल्या स्विफ्ट कार (एमएच 21 बीएफ 7178) यांच्यामध्ये देवगड फाट्याजवळ भीषण अपघात झाला. यात ५ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृत जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात स्विफ्ट कार ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूस घुसल्यानं स्विफ्ट कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू केलं. जखमींना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा इथं हलवण्यात आलं आहे. सर्व पाचही जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. पुढील कार्यवाही नेवासा पोलीस करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा