महाराष्ट्र

गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारची परवानगी; अमोल कोल्हे म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

केंद्र सरकारने गुजरातमधून दोन हजार टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, आज आपला कांदा उत्पादक शेतकरी रडतोय. 2 डिसेंबरला कांद्याला भाव होता 40 रुपये. यांनी निर्यातबंदी केली कांद्याचा भाव गेला 10 रुपयांवर. निर्यातच नाही कांद्याची म्हणून आमचा कांदा उत्पादक शेतकरी रडतोय महाराष्ट्रातला डिसेंबरपासून रडतोय. त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते काही म्हणत नाहीत. आज गुजरातमधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फक्त गुजरातमधल्या हा. फक्त गुजरातमधल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा दोन हजार मेट्रिक टनच्या निर्यातीवरची बंदी उठवली.

तसेच ते पुढे म्हणाले की, भाकरी महाराष्ट्राची खायची आणि चाकरी गुजरातची करायची. हीच जर यांची नियत असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने, शेतकऱ्याच्या लेकरांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की जर आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात तुम्ही माती कालवता आणि भलं तुम्ही गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे करता तर कशाला येता आमच्याकडे मते मागायला. गुजरातमध्येच जाऊन मतं मागा. असे अमोल कोल्हे म्हणाले.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा