महाराष्ट्र

राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा; 2 हजार लोकांची भरती करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिव्यांगासाठी मोठा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची घोषणा त्यांनी केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिव्यांगासाठी मोठा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची घोषणा त्यांनी केली आहे. यासोबतच, या विभागात 2 हजार 63 लोकांची भरती करणार असल्याची माहिती त्यांनी दिले आहे. तसेच, खोके-खोके सरकार म्हणणाऱ्यांना जर दिव्यांगांच्या एवढे बौद्धिक डोके आले तरी खूप झाले, असा टोलाही शिंदेंनी शिवसेनेला लगावला आहे. जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग असला पाहिजे, अशी कडू यांची मागणी होती. हे सर्वसामान्य हिताचे सरकार आहे. ज्या दिवशी कारभार हाती घेतला. तेव्हापासून राज्यांचे हिताचे निर्णय घेत आहे. लाखो रोजगार देण्याचे काम सुरू आहे. 75 हजार शासकीय नोकऱ्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच, नियुक्ती करण्याचा कार्यक्रम आपण सुद्धा घेतला.

तीन टक्के लोक अपंग आहेत. स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय घोषणा करत आहोत. दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग केला जाईल. यामध्ये 2 हजार 63 लोकांची भरती केले जाईल. या विभागाला स्वतंत्र सचिवही असणार आहे. हे सरकार संवेदनशील आहे. आम्हाला भावना कळतात. 24 दिवसांत विभाग झाला आहे. हा काय छोटा मोठा निर्णय नव्हे. बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा दिव्यांगांवर प्रेम होते. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांनी कोठेही पैसे कमी पडणार नाही, असे सांगितले आहे.

मंत्रालयासाठी विकासाला 1143 कोटी दिव्यांग मंत्रालयासाठी तरतूद करण्यात आले आहेत. देशातला पहिला हा निर्णय आहे. जे दिव्यांग वर गुन्हे दाखल झाले होते राज्य सरकार गुन्हे मागे घेणार, अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

बच्चू भाऊ कधी खोके घेतील का, असा प्रश्न विचारत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, खोके-खोके सरकार म्हणणाऱ्यांना जर दिव्यांगांच्या एवढे बौद्धिक डोके आले तरी खूप झाले. ज्यांनी रोखने व्यवहार केले त्यांना फक्त खोक्यांचीच भाषा समजते. तुम्ही आरोप करत रहा मात्र आम्ही कामातून उत्तर देऊ, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू