Ashadhi Ekadashi 
महाराष्ट्र

Ashadhi Ekadashi : यंदाही वारकऱ्यांना टोलमाफी; शासनाकडून निर्णय जारी

यंदाही पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Ashadhi Ekadashi) यंदाही पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शासनाकडून हा निर्णय जारी करण्यात आला असून पंढरपूरला जाणाऱ्या 10 मानाच्या पालखी मार्गावर ही टोलमाफी असणार आहे. पंढरपूरला जाणाऱ्या जड आणि हलक्या वाहनांना टोलमाफी मिळणार असून वारकरी, मानाच्या पालख्या आणि भाविकांना ही टोलमाफी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

आषाढी वारीच्या निमित्ताने 18 जून ते 10 जुलै दरम्यान ही टोलमाफी असणार आहे. राजभरातून अनेक वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंड्या घेऊन पंढरपूरला पायी जात असतात.

या टोलमाफीसाठी चालकाचे नाव, गाडीचा नंबर नोंद करून त्याचे स्टिकर्स, परिवहन विभाग, पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manikrao Kokate : मंत्रिमंडळात खांदेपालट ! माणिकराव कोकाटेंना धक्का; कृषीमंत्रिपदी दत्तात्रय भरणेंची वर्णी ?

Mahadev Munde Case : 'दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही'; अशी मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांची माहिती

Latest Marathi News Update live : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Rakshabandhan 2025 : महागाई वाढली, पण रक्षाबंधनाचा उत्साह तसाच!