महाराष्ट्र

तालिबानी चौक्या उभारून बैलगाडा शर्यती चिरडण्याचा प्रयत्न

Published by : Lokshahi News

संजय देसाई | राज्यात बैलगाडा शर्यतीवरून राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. तालिबान सारख्या चौक्या उभ्या करून बैलगाडी शर्यती पोलिस बळावर चिरडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत नी केला आहे.प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.

आटपाडीच्या झरे या ठिकाणी उद्या 20 ऑगस्ट रोजी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलं आहे. आणि या शर्यतीच्या मुद्द्यावरून जोरदार संघर्ष प्रशासनाने पडळकर यांच्यात निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून आसपास 9 गावात संचारबंदी लागू केली आहे तर दुसरीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.

दरम्यान या नाका बंदीचा फटका कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनाही बसला. पोलीस प्रशासनाकडून त्यांना या ठिकाणी जात असताना रोखून धरण्यात आले.परवानगी नसल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.मात्र त्यांनी रस्त्यावरच ठिय्या माडण्याची भूमिका घेतल्याने अखेर पोलिसांच्या कडून त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर खोत यांनी झरे या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा