महाराष्ट्र

‘ज्याची वकिली केलीत तो मनसुखचा खुनी निघाला’; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Published by : Lokshahi News

आधी अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि आता माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकणात महाविकास आघाडी सरकारवर भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. या सर्व प्रकरणी आता एटीएसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला आहे. मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी सचिन वाझे यांचा मृत्यूमागे हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर एटीएसने तपास हाती घेत या प्रकरणातील महत्वाचे खुलासे केले आहेत. या पार्श्वभूमीवर एटीएसची पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तोंड लपवायला जागा उरली आहे का? असा सवाल करत अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका आहे.

एटीएसची पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तोंड लपवायला जागा उरली आहे का? विधीमंडळ अधिवेशनात आपण ज्याची वकिली केलीत तो मनसुख चा खुनी निघाला. थोडी लाज शिल्लक असेल तर तोंड काळे करा असे म्हणत भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chandrakant Khaire On Nishikant Dubey : निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे संतापले, म्हणाले, "आमच्या पैशांवर तुमचं झारखंड आणि..."

Nishikant Dubey : "कोण कुत्रा आणि कोण वाघ..." मुंबईत हिंदी भाषिक वादावरून निशिकांत दुबे यांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, जनसुरक्षा समिती प्रमुख तसेच महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Suprime Court : निष्काळजी वाहनचालकाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला विमा भरपाई नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल