Bachchu kadu 
महाराष्ट्र

बच्चु कडूंची भोंग्याच्या वादात उडी; राजकीय सभेतले भोंगेही...

Published by : left

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर राज्यात भोंग्याचा वाद चांगलाच पेटला आहे. या भोंग्याच्या वादावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी भोंग्यावर मोठे विधान केले आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu kadu) यां नी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे मोठं विधान केले आहे.यावेळी त्यांनी भोंग्याच्या विषयावर बोलताना, दोन वर्षे कोरोनामुळे सर्व मंदिर,बौद्ध विहार,मशिदीमधील भोंगे बंद होते. त्यावेळी फक्त रुग्णवाहिकेचा भोंगा सुरू होता, असे सांगितले. तसेच देश सध्या कशा परिस्थितीत आहे. त्यामुळे इतर मुद्दे बाजूला सारून वेगळे मुद्दे मांडले जात असल्याचा आरोप केला.

तसेच भोंगे बंद करायचे असेल तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजेत अशी थेट भूमिका बच्चू कडूंनी घेतली. निवडणूकीत राजकीय लोकांचे भोंगे बंद करून भोंगा नावाचा शब्दच बंद करावा अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा