महाराष्ट्र

मृत्यूनंतरही मरणयातना; रस्त्याअभावी गुडघाभर पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा

Published by : Lokshahi News

मयूरेश जाधव | बदलापुरात एका मृतदेहाची रस्त्याअभावी गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागल्याची दुदैवी घटना घडली आहे. मृत व्यक्तीच्या पुतण्याने फेसबुकवर पोस्ट टाकत ही घटना चव्हाट्यावर आणली आहे. ही घटना पाहता प्रशासन इतक ढीम्म झालं आहे का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

बदलापुरात बेलवली सबवेत साचलेल्या गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली.बेलवली स्मशानात जाण्यासाठी एकच मार्ग उरला होता. याआधी असलेला मार्ग रेल्वेने रेल्वे फाटक बंद करून संरक्षत भिंत घालून बंद केला होता. त्यामुळे स्मशानाकडे जाण्यासाठी बेलवली सबवेचाच मार्ग उरला होता. त्यात बेलवली सबवेत पावसाळयात तसेच परिसरातील इमारतींच्या सांडपाण्याचे पाणी साठत असते. त्यामुळे मृतदेहाची गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागल्याची दुदैवी घटना घडली.

विशेष म्हणजे ही निव्वळ आजची समस्या नसून दररोज अशा समस्येला बेलवली ग्रामस्थांना तोंड द्यावे लागते. रेल्वेने रेल्वे फाटक बंद करून स्मशानाकडे जाण्याचा मार्ग संरक्षत भिंत घालून बंद केला. परंतू आम्हाला पर्यायी व्यवस्था करून दिली नाही असा आरोप फेसबूक पोस्टमध्ये करण्यात आला. तसेच आमच्या या समस्येकडे कोणतंही प्रशासन लक्ष देत नाही नसल्याचे म्हटले. नगरपालिकेच्या मार्फत मुख्याधिकारी यांनी लक्ष घालावे तसेच रेल्वे प्रशासन यांना देखील आमच्यासाठी पादचारी पुलाला परवानगी द्यावी व ही समस्या सोडवावी, अशी मागणी मृत व्यक्तीच्या पुतण्याने फेसबुकवर पोस्ट टाकत केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shubman Gill : 'त्या' प्रकरणामुळे शुभमन गिल अडचणीत? BCCI कडून कारवाईची शक्यता

MNS Leader Video Viral : मनसे नेत्यांच्या मुलाचा 'त्या अवस्थेतील' Video Viral; अभिनेत्रींला केली शिवीगाळ

Latest Marathi News Update live : पुढील २४ ते ४८ तासांसाठी विदर्भाला ऑरेंज अलर्ट

Pandharpur : पंढरपुरात सुरक्षा रक्षकाची दादागिरी! दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकाला अमानुष मारहाण