महाराष्ट्र

मुंबईत कोसळधारा! बेस्ट बसच्या मार्गात बदल

Maharashtra Rain : सखल भागांमध्ये पाणी तुंबल्याने बेस्टने बसच्या मार्गात केले बदल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टने काही बसेसच्या मार्गात बदल केला आहे. यासंबंधीची माहिती ट्विटर अकाउंटद्वारे देण्यात आली आहे.

मुंबई शहरासह उपनगरामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीला बसत आहे. मुंबईकरांना वाहतुकीची सुविधा पुरवणाऱ्या बेस्टने आपल्या काही मार्गात बदल केले आहेत. चेंबूर व सायन येथे पाणी भरल्याने बसच्या 357, 360, 355 (म) या मार्गात बदल केला आहे. बेस्टने काही बसेसचे मार्ग बदलले बस क्र. ३५७, ३६०, ३५५ (लि) चेंबूर शेल कॉलनी येथून आंबेडकर उद्यान मार्गे, चेंबूर नाका ते सुमन नगर पर्यंत धावणार आहेत. व सायन रोड नं. २४ येथील सर्व बसेस मुख्य मार्गाने धावतील.

तर, मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल काही सेंट्रल, हार्बर मार्गावरील गाड्या 10-15 मिनिटांपेक्षा जास्त उशिराने धावत आहेत. यासंबंधीची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.

दरम्यान, आयएमडीने मंगळवारी महाराष्ट्रात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यासाठी हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे आणि उत्तर कोकण, उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा