महाराष्ट्र

दिपाली सय्यद अन् राज्यपालांचे साटेलोटे; अनेकांना कोट्यवधींचा गंडा

सांगली येथे पत्रकार परिषदेत दिपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय देसाई | सांगली : अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. बोगस लग्न लावली. लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा दाखवला, असे आरोप दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांचा गंभीर आरोप केले आहेत. सांगली येथे भाऊसाहेब शिंदे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाऊसाहेब शिंदे म्हणाले की, दिपाली सय्यद यांनी अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. सामुदायिक विवाहाच्या नावाखाली बोगस लग्न लावली आहेत. लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत लग्नात दिलेले सोने देखील बनावट आहेत. ज्यांची लग्न लावली त्या जोडप्यांना अपत्य आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि दिपाली सय्यद यांचे साटेलोटे आहेत, असे आरोप दीपाली सय्यद केले आहे.

दिपाली सय्यद ट्रस्टच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये हडपले. ट्रस्टच्या खात्यात फक्त 9 हजार, मग कोट्यवधी रुपये आणले कोठून आणि कोणाला दिले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

दिपाली सय्यद यांचे दुबई आणि पाकिस्तानातही कनेक्शन आहे. राज्यपाल यांना पदावरून लवकर हटवावे आणि आर्थिक गुन्हे शाखेने या ट्रस्टची चौकशी केली नाही. तर उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा