महाराष्ट्र

केंद्र सरकार संघाच्या रिमोटवर… भूपेश बघेल यांचा नागपुरात आरोप

Published by : Lokshahi News

इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात काँग्रेसने देशभरात आंदोलन हाती घेतले आहे. यासाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

सध्या महागाईमुळे देशातील जनता त्रस्त आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रिमोटवर चालते. यामुळे आता संघानेच महागाई कमी करण्यासाठी पुढाकार घेत हस्तक्षेप करावा व केंद्राला सूचना करावी. यासाठीच आपण नागपुरात येऊन ही मागणी करत आहोत. माझा आवाज संघाच्या कानापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे, असा टोला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी लगावला आहे.

अ.भा. काँग्रेस समितीतर्फे महागाईविरोधात देशभरात जनजागरण केले जात आहे. याअंतर्गत भूपेश बघेल यांनी नागपुरात येत केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारने गेली सात वर्षे हिंदू- मुस्लीम, मंदिर- मशीद, अशा भावनिक मुद्यांवर घालवले. जनहिताच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच महागाईने उच्चांक गाठला आहे, असे बघेल म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच