महाराष्ट्र

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या संपन्न

Published by : left

महाराष्ट्र भूषण डॉ. तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेले स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या पार पडले आहे. या स्वच्छता अभियानात असंख्य नागरीकांनी सहभाग नोंदवला होता.

श्रीमत दासबोध या ग्रंथाच्या निरुपणातुन समाज घडवणारे महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म 1 मार्च 1922 रोजी झाला.त्यांनी लाखो लोकांना व्यसनमुक्त केले, त्यांचे संसार सावरले, समाजाला अंधश्रध्देच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे काम केले. यासोबतच समाजमन घडवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.
नानासाहेबांचे हे कार्य आता त्यांचे चिरंजीव पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि आप्पासाहेबांचे चिरंजीव रायगडभूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी करत आहेत. त्याचेच एक उदाहरण म्हणजे आजचे स्वच्छता अभियान आहे.

महाराष्ट्र भूषण डॉ. तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगडभूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून मुंबईसह संपूर्ण राज्यात रविवारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. हे स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या पार पडले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; "मी आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो, मग... "

Latest Marathi News Update live : भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, भारताचा इंग्लंडवर 6 धावांनी रोमहर्षक विजय

Washim Crime : प्रसूतीदरम्यान आईचा आक्रोश! वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेला मारहाण करत दिला पोटावर दाब; वाशिम स्त्री रुग्णालयातील प्रकार

Former Jharkhand Chief Minister Shibu Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन