महाराष्ट्र

‘मनसे’ नंतर भाजपा दहीहंडी उत्सवासाठी आग्रही; ठाकरे सरकारला दिला इशारा

Published by : Lokshahi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर आता भारतीय जनता पार्टी दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम आहे. ठाकरे सरकारचा हिंदू उत्सव विरोधी कोणताही निर्णय… आम्हाला मान्य नाही अशी ठाम भूमिका घेत, भाजपा दहीहंडी उत्सव धडाक्यात साजरा करणारच, असा इशारा भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी दिला आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचं सावट असल्याचं सर्वच प्रकारच्या सण-उत्सव साजरे करण्यावर बंधन आली होती. यंदाच्या गणेशोत्सवावर सुद्धा अशीच बंधने आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर आता मनसेनं दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचा निर्धार केला होता. यंदा ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचं मनसेकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यांनतर आता भाजपाने सुद्धा राज्यात भाजपा दहीहंडी उत्सव धडाक्यात साजरा करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सव साजरी करण्यासाठी 'मनसे' नंतर भाजप आग्रही आहे.

ठाकरे सरकारचा हिंदू उत्सव विरोधी कोणताही निर्णय आम्हाला मान्य नाही.श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी उत्सव धूम धडाक्यात साजरा करणार असा इशाराच राम कदम यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...