महाराष्ट्र

मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातीबाबत बीएमसीचा मोठा निर्णय

मुंबई आणि उपनगरांत पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. यामुळे धरणं, नदी, नाले तुडुंब भरले असून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात उशिराने दाखल झालेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरांतही पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. यामुळे धरणं, नदी, नाले तुडुंब भरले असून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव तुडुंब भरले आहेत. यामुळे मुंबईवरील पाणीकपात आता मागे घेण्यात येणार आहे.

यंदा पावसाळ्यास बराच विलंब झाला असून महाराष्‍ट्रात पावसाचे उशिरा आगमन झालेले आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये दमदार पावसाअभावी पुरेसा पाणीसाठा नसल्याने शनिवार १ जुलैपासून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावत मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटवली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव भरले असल्याने बीएमसीने पाणीकपात मागे घेण्य़ाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पाणीकपात पुढील आठवड्यापासून रद्द करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्यात उद्यापासून मान्सूनची तीव्रता कमी होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दक्षिण ओरिसा भागात असलेल्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून राज्यावरचा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे स्थित आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. १ ऑगस्टपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार आहे. तर, पुण्यात पुढचे काही दिवस ढगाळ हवामान राहील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू