महाराष्ट्र

६ खलाशांसोबत बोट बेपत्ता

Published by : Lokshahi News

निसार शेख
कोकणातील रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील नासीर हुसैनमियाँ संसारे यांच्या मालकीची मासेमारी करणारी "नावेद २" ही बोट तब्बल ६ खलाशांसह बेपत्ता आहे. कोणताही संपर्क होत नसल्याने चिंतेच वातावरण आहे.

दरम्यान खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट व काही खाजगी बोटींकडून युद्धपातळीवर 'सर्च ऑपरेशन' हाती घेण्यात आले आहे. ही बोट २६ ऑक्टोबर  मंगळवारी सायंकाळी उशीरा जयगड मधून मासेमारी साठी समुद्रात गेली होती. तब्बल पाच दिवस ही बोट बेपत्ता आहे.

या बोटिवर दगडू तांडेल नामक मुख्य चालक असुन गोविंद नाटेकर, दत्ता, सूर्या, अनिल, अमोल हे चार खलाशी बोटिवर आहेत. हे सगळे गुहागर तालुक्यातील खलाशी आहेत.पोलीस, बंदर अधिकारी, मेरीटाईम बोर्ड आदी सागरी सुरक्षा यंत्रणा समन्वय ठेऊन असुन शोधकार्य सुरु आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच