महाराष्ट्र

नंग्या तलवारी घेऊन बिल्डर आले आमने सामने

Published by : Lokshahi News

महेंद्र वानखडे | दहिसरमध्ये नंग्या तलवारी घेऊन दोन बिल्डरांमध्ये तुफान राडा झाला. जमिनीच्या वादातून हा राडा असून यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने कायदा सुव्यवस्था आहे की नाही ? अस सवाल उपस्थित होत आहे.

दहिसरमध्ये दिवसाढवळ्या १० पेक्षा अधिक जण तलवार घेऊन रस्त्यावर उतरले होते. जमिनीच्या वादातून दोन बिल्डरमध्ये झालेल्या राड्यामुळे १० पेक्षा अधिक जण तलवार घेऊन राडा घालत होते. या राड्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून यात दोन वकिलांचा समावेश आहे. त्याच्यावर बोरिवलीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान १० पेक्षा अधिक जण दिवसाढवळ्या तलवार घेऊन दंगा करताना दिसत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था आहे की नाही ? तलवार घेऊन येऊन मारहाण करण्याइतकी हिम्मत होतेच कशी..? असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेवर पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यावर बोलण्यास नकार दिला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा