Shinde-fadnavis Government Team LOkshahi
महाराष्ट्र

शिंदे- फडणवीस सरकारचा लवकर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार, उपमुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

कॅबिनेट मंत्र्यांच्या जोडीला आता राज्यमंत्रीही नव्या विस्तारात असतील

Published by : Sagar Pradhan

राज्यात तीन महिन्यांपूर्वी अभूतपूर्व राजकीय गोंधळ घडला आणि राज्यात नवे शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर अनेक टीका झाल्यानंतर सत्तास्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारावर देखील विरोधकांकडून टीका झाली. आता या सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार पार पडणार आहे. हा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार लवकरच पार पडेल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय १८ कॅबिनेट मंत्र्यांचाच समावेश आहे. यामध्ये शिंदे गटाचे नऊ, तर भारतीय जनता पक्षाचे नऊ मंत्री आहेत. त्यामुळे कॅबिनेट मंत्र्यांच्या जोडीला आता राज्यमंत्रीही नव्या विस्तारात असतील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येणार आहे. सध्या केवळ कॅबिनेट मंत्रीच आहेत, त्यामुळे अनेकांवर इतर विभागाचा पदभार आहे. राज्यमंत्री नसल्याने अनेक मंत्र्यांकडे अतिरिक्त मंत्रालयाचा पदभार आहे, तो कमी करण्यासाठी येत्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे. या नव्या विस्तारात कोणाला किती मंत्रिपदे मिळतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. सोबतच शिंदे गटातील अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा होती. बच्चू कडू आणि संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या विस्तारात यांची नाराजी होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?