Sambhaji Nagar Team Lokshahi
महाराष्ट्र

औरंगाबादचे नाव 'छत्रपती संभाजीनगर' करण्यास केंद्र सरकारची मंजुरी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत, मानले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे आभार.

Published by : Sagar Pradhan

अनेक दिवसांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित होता. त्यानंतर आज केंद्र सरकारने या दोन्ही शहरांच्या नामांतराला मंजुरी दिली आहे. यापुढे औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असे असणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत माहिती दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामंतराला मंजुरी दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’असेही फडणवीस यांनी म्हटले.  

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य