महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी कोकणात केली. मला त्यांना सांगायचं आहे की, औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं. हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात.

सत्ता गेल्यानंतर तुम्हाला कोकणवासीयांची आठवण झाली. अडीच वर्षे सत्तेच्या काळात कोकणला दमडीही दिली नाही. उलट चांगल्या प्रकल्पांना विरोध केला आणि ही देवभूमी विकासापासून वंचित ठेवली. आता फक्त मतं मिळविण्यासाठी तुम्हाला कोकणची आठवण झाली.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, कोकण वादळात सापडलं तेव्हा तुम्ही घरात बसून होतात तर देवेंद्रजी आणि राणे साहेब कोकणात येऊन लोकांना आधार देत होते. महापूर आला तेव्हा तुमच्या लोकांनी केलेली गुंडगिरी कोकणी माणूस विसरला नाही. मोदीजी आणि नारायण राणेजींच्या प्रयत्नातून कोकणचा विकास होतोय. आता तुम्ही कितीही थापा मारल्या तरी कोकणी माणूस तुमच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तांदळाची पेज; जाणून घ्या फायदे

Sanjay Raut On IND-PAK Match : पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं' भारत-पाक सामन्यावर संजय राऊतांचा संताप

Latest Marathi News Update live : जालन्यात बंजारा समाजाचा मोर्चा

India- Pakistan Match : भारताचा पाकिस्तानवर विजय, पण हस्तांदोलन टाळून खेळाडूंनी दिला ठाम संदेश