Maharashtra Weather  
महाराष्ट्र

Maharashtra Weather : राज्यात वाढला थंडीचा कडाका; 'या' भागात गारठा कायम राहणार

राज्यात थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Maharashtra Weather ) राज्यात थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात घट असल्याने गारठ्याचे प्रमाण अधिक असून मागील काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम आहे. पुढील दोन - तीन दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

थंडीची लाट पुढील दोन तीन दिवस कायम असल्याने गारठ्याचे प्रमाण सर्वाधिक राहील. उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. अनेक भागातील किमान तापमानात घट झाली आहे. काही भागात सरासरीपेक्षा कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात मंगळवारी १६.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या भागात पुढील काही दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.

Summery

  • राज्यात थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता

  • थंडीची लाट पुढील दोन तीन दिवस कायम असल्याने गारठ्याचे प्रमाण सर्वाधिक राहील

  • उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडीचे प्रमाण वाढले

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा