महाराष्ट्र

नागरिक ऑफिसला कसे जाणार?, संजय निरूपम यांचा ठाकरे सरकारला सवाल

Published by : Lokshahi News

दुसऱ्या लाटेचा जोर कमी होत असताना राज्यात कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने पाच गटात विभागणी केली असून, मुंबई ही तिसऱ्या गटात मोडत आहे, लोकल बंद असल्याने नागरिक ऑफिसला कसे जाणार? असा सवाल काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी ठाकरे सरकारला केला आहे.


संजय निरुमप यांनी ट्वीट करून ठाकरे सरकारला प्रश्न विचारला आहे. मुंबईमध्ये लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. पण, याचा लोकांना त्रासच जास्त होणार आहे. कार्यालये उघडली जात आहेत, पण सार्वजनिक वाहतूकच नाही. एकतर बसेसची संख्या वाढविण्यात यावी किंवा नियंत्रित प्रमाणात लोकल सुरू करण्यात यावी. नाहीतर लोक ऑफिसला कसे जाणार? वर्क फ्रॉम ऑफिसलाही एक मर्यादा आहे, असं म्हणत निरुमप यांनी ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाला सुनावलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."