महाराष्ट्र

सरकारने सोडलं वाऱ्यावर… पूरग्रस्तांसाठी स्थानिकांनी लावला फलक

Published by : Lokshahi News

सांगलीच्या ग्रामीण भागात झळकलेल्या एका अनोख्या फलकाची जोरदार चर्चा आहे. पुराच्या काळात सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा मजकूर विवेकानंद मंडळाने आपल्या फलकावर लिहिला.

या पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांचा आरोप असून विद्यमान सरकारबद्दल संताप व्यक्त करणाऱ्या अनोख्या फलकाची सांगलीत जोरदार चर्चा आहे. विवेकानंद मंडळाच्या सदस्यांनी आपल्या मंडळाच्या फलकावर लिहिलेला हा मजकूर सरकारचे वाभाडे काढणारा आहे.

सरकारने वाऱ्यावर सोडले तर आपले लोक आपली जबाबदारी असे म्हणत मंडळाचे अध्यक्ष राहुल बोळाज आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या पूरपरिस्थितीत गावभागातील नागरिकांना मदत केली.

मात्र सरकारची ही जबाबदारी असताना सरकारी यंत्रणा मात्र गावभागात पोहोचल्या नाहीत. त्यामुळे सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. असा मजकूर लिहीत कोणत्याही अडचणीसाठी संपर्क साधण्याचे आणि एकमेकांना मदत करण्याचा संदेशही या फलकातील मजकुरातून स्पष्टपणे दिसत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली