महाराष्ट्र

नाकाबंदीमुळे चोरटे गजाआड ; १४ दुचाक्या आणि ४ रिक्षा हस्तगत

Published by : Lokshahi News

अनलॉक काळात दुचाकी चोरींच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होऊन दररोज ८ ते १० दुचाकी चोरीच्या घटना भिवंडी परिसरात घडत आहेत. यामुळे पोलिसांनी शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नाकेबंदी करून पोलीस गस्त सुरू करण्यात आली आहे.

अखेर पोलिसांच्या नाकेबंदीला यश येऊन दुचाकी चोरणाऱ्यांना शांतीनगर पोलिसांनी गजाआड केली आहे. या चोरट्यांकडून विविध कंपनीच्या तब्बल १४ दुचाक्या आणि ४ रिक्षा हस्तगत करण्यात आल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

मोहम्मद सरजील सिराज अहमद मोमीन (वय १९ रा. खान कंम्पाउन्ड, भिवंडी) फिरोज हबीब शेख उर्फ लाला (वय २५ रा. गैबीनगर, भिवंडी ) असे गजाआड केलेल्या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?