महाराष्ट्र

Cyclone Biparjoy : मुंबईतील जुहू बीचवर ६ जण बुडाले

बिपरजॉय या चक्रीवादळाने आता भयंकर रुप घेण्यास सुरुवात केली.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : बिपरजॉय या चक्रीवादळाने आता भयंकर रुप घेण्यास सुरुवात केली आहे. हे वादळ 15 जून रोजी गुजरातमधील कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. परंतु, याचा परिणाम मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर दिसत असून उंच लाट उसळत आहेत. अशातच, मुंबईतील जुहू बीचवर सहा जण बुडाले आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतील किनारपट्टीवर दिसत येत आहे. जुहू बीचवर सहा जण समुद्रात गेले असता उंच लाटांमुळे सर्वजण वाहून गेले. उपस्थित लोकांनी तातडीने धाव घेत मदतीचा प्रयत्न केला. यात दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, चार जण बेपत्ता असून बचावकार्य सुरू आहे. बिपरजॉयमुळे लाटा उसळत असल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहे.

दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मुसळधार पाऊस आणि वादळाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. वास्तविक, बिपरजॉय हे चक्रीवादळ धोकादायक बनले असून 15 जून रोजी ते पश्चिम किनारपट्टीवर पोहोचू शकते. बिपरजॉयमुळे मुंबईतील हवामान खराब होत असून विमान उड्डाणांचे वेळापत्रक बिघडले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा