महाराष्ट्र

इतिहासातील सर्वात घाबरट आणि पळपुटं सरकार; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

Published by : Lokshahi News

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. यावेळी विरोधकांच्या गोंधळातच विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजूर झालं. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि सर्वात पळपुटं सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार आहे हे आज सिद्ध झालं असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

विधानसभेत विद्यापीठाच्या कायद्यावर चर्चा सुरू असताना जाणीवपूर्वक, ठरवून चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेऊन चर्चा न करता, हे विधेयक मंजूर करून घेण्याचं पाप आज सरकारने केलं आहे. दुर्दैवाने या पापामध्ये विधानमंडळाचं सचिवालय देखील पूर्णपणे सहभागी असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे.आजचा दिवस महाराष्ट्रातील लोकशाहीचा सर्वात काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि सर्वात पळपुटं सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार आहे हे आज सिद्ध झालं असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

राज्य सरकारला विद्यापीठांना आपलं शासकीय महामंडळ बनवायचंय, नवीन विद्यापीठ कायद्याने आतापर्यंतच्या कुठल्याही कायद्यात कधीही मंत्र्यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक बाबीत ढवळाढवळ करण्यासाठी कुठलीही तरतूद नव्हती. असेही ते म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganeshotsav 2025 : स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत अभिनेत्री सायली संजीवने केली गणरायाची प्राण प्रतिष्ठापना

Latest Marathi News Update live : जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास अटीशर्थीसह परवानगी

Ganesh Chaturthi 2025 : "माझी आई व बाबा पाच वर्षापासून...." लग्नाबाबत बिग बॉस फेम शिव ठाकरे यांच मोठ वक्तव्य

Ganeshotsav 2025 : अभिनेता सुबोध भावेंच्या घरी बाप्पाचं आगमन