महाराष्ट्र

”दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला सरकार वाचवतंय”; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

Published by : left

राष्ट्रवादी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा न दिल्यास चुकीचा संदेश जाईल. राजीनामा घेणार नाही ही सरकारची भूमिका चुकीची आहे. तसेच दाऊदला मदत करणाऱ्या मंत्र्यांला सरकार वाचवत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

नवाब मलिकांना 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परीषद घेत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. दाऊद भारतातून टेरर फंडींग करतोय. मंत्री नवाब मलिक यांनी घेतलेली जमीन बॉम्बस्फोटातील आरोपांकडून घेतलीय. त्यातला एक हसीना पारकरचा ड्राईव्हर आहे. जमीनीच्या मालकांनी सांगितलं पैसे नाही मिळाले, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

एखाद्या मंत्र्याने बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन का घेतली? हसीना पारकशी व्यवहार का केला. या व्यवहारानंतर तीन वेळा बॉम्बस्फोट. जे लोकं बॉम्बस्फोट करतात अशा लोकांना पैसे देणे निंदनीय असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. त्यामुळे ईडीने केलेली कारवाई नियमानुसार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.


नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा

कुठल्याही राजकीय पक्षाने टेरर फंडिंग होण्याला निषेध केला पाहिजे. यात राजकारण केलं नाही पाहिजे, सर्वांनी एकत्र दाऊदविरोधात भूमिका मांडली पाहिजे. तसेच माझ्याकडे जी कागदपत्र होती ती मी ईडी आणि एनआयएला दिली आहेत. असेही फडणवीस म्हणाले. नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा. देशात यामुळे अतिशय चुकीचा संदेस जाईल की दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला सरकार वाचवतंय. असेही ते म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू