महाराष्ट्र

11th Admission Update : अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शिक्षण विभागाचा दिलासादायक निर्णय ; अपूर्ण अर्जदारांना मिळणार पाचही फेऱ्यांमध्ये संधी

अपूर्ण अर्जदारांना सर्व फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संधी

Published by : Shamal Sawant

११वीच्या प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल करत शिक्षण विभागाने एक सकारात्मक निर्णय घेतला आहे, जो हजारो विद्यार्थ्यांना दिलासा देणारा ठरणार आहे. आतापर्यंत अपूर्ण अर्ज असल्यास विद्यार्थ्यांना पुढील फेऱ्यांमध्ये सहभाग घेता येत नव्हता, मात्र आता अशा विद्यार्थ्यांना सर्व पाच फेऱ्यांमध्ये नोंदणीची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी पुन्हा

ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे अपूर्ण राहिले होते किंवा वेळेत सबमिट करता आले नव्हते, त्यांना आता कोणत्याही फेरीत सहभागी होता येईल. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळणार आहे.

एटीकेटी आता फक्त राज्य मंडळापुरती मर्यादित

शिक्षण विभागाच्या दुसऱ्या निर्णयानुसार, राज्य मंडळातील विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली ATKT (Allowed to Keep Terms) सवलत इतर कोणत्याही मंडळासाठी लागू होणार नाही. म्हणजेच CBSE, ICSE व इतर मंडळातील विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळणार नाही, अशी स्पष्टता शिक्षण विभागाने दिली आहे.

ATKT म्हणजे काय?

ATKT ही अशी व्यवस्था आहे ज्या अंतर्गत विद्यार्थ्याला काही विषयांत नापास असूनही पुढील वर्गात प्रवेश घेता येतो, मात्र तो विषय पुन्हा परीक्षेद्वारे पास करावा लागतो. ही सवलत केवळ राज्य मंडळातील विद्यार्थ्यांसाठीच लागू असेल.

निर्णयामुळे विद्यार्थ्यांत आनंद

या दोन्ही निर्णयांमुळे अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या मागास भागांतील विद्यार्थ्यांना अपूर्ण अर्जांमुळे प्रवेश मिळत नव्हता, परंतु आता प्रवेशाची संधी पुन्हा मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी