महाराष्ट्र

महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय..., एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. म्हणून आता महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फेसुबक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. तुम्हाला मी मुख्यमंत्रिपदी नको आहे का? असा थेट सवाल विचारत मुख्यमंत्र्यांनी कळीच्या मुद्द्याला हात घातला. यावेळी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य करताना त्यांनी शिंदेंचा नामोल्लेख टाळला. याचदरम्यान आता एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा सुचक ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे असं म्हटले आहे. तसेच गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि यामध्ये शिवसैनिक भरडला गेला आहे. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. म्हणून आता महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा