महाराष्ट्र

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, मुख्यमंत्री म्हणाले...

राज्यभरात कांद्याचे भाव पडल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडला आहे. यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक सभागृहात आक्रमक झाले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यभरात कांद्याचे भाव पडल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडला आहे. यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक सभागृहात आक्रमक झाले असून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलनही केले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, कांदा भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. नाफेडने देखील कांदा खरेदी चालू केली आहे. हे सरकार शेतकऱ्याचे आहे. जेव्हा शेतकरी अडचणीत आला तेव्हा तेव्हा नियम डावलून खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. कांद्याच्या निर्यातीवर कोणतेही बंधन नाही. गरज भासल्यास शेतकऱ्यांना काही आर्थिक मदतही केली जाईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

शेतकऱ्यांसाठी समिती गठीत केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. राज्य सरकारने माजी पणन संचालक डॉ. सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती कांदा बाजारभावातील घसरण आणि उपाययोजना यांचा अभ्यास करणार आहे. व आठ दिवसांत सरकारला उपाययोजनांचा अहवाल सादर करणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू