महाराष्ट्र

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, मुख्यमंत्री म्हणाले...

राज्यभरात कांद्याचे भाव पडल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडला आहे. यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक सभागृहात आक्रमक झाले

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यभरात कांद्याचे भाव पडल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडला आहे. यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक सभागृहात आक्रमक झाले असून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलनही केले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, कांदा भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. नाफेडने देखील कांदा खरेदी चालू केली आहे. हे सरकार शेतकऱ्याचे आहे. जेव्हा शेतकरी अडचणीत आला तेव्हा तेव्हा नियम डावलून खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. कांद्याच्या निर्यातीवर कोणतेही बंधन नाही. गरज भासल्यास शेतकऱ्यांना काही आर्थिक मदतही केली जाईल, असे त्यांनी म्हंटले आहे.

शेतकऱ्यांसाठी समिती गठीत केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. राज्य सरकारने माजी पणन संचालक डॉ. सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती कांदा बाजारभावातील घसरण आणि उपाययोजना यांचा अभ्यास करणार आहे. व आठ दिवसांत सरकारला उपाययोजनांचा अहवाल सादर करणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

S. Jaishankar On Donald Trump : भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीवरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे स्पष्ट विधान; ट्रम्प यांचा दावा पुन्हा फेटाळला

Cotton Market News : कापसाचा दर कमी होण्यासाठी शासन जबाबदार; नागपूर खंडपीठाचे सरकारवर कडक शब्दात ताशेरे

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गीलचं पहिलं द्विशतक

'Good day' Britannia Company : 'गुड डे' बिस्किटमध्ये जीवंत अळ्या; कंपनीला करावी लागणार इतक्या रुपयांची नुकसानभरपाई