महाराष्ट्र

Eknath Shinde : गणेशोत्सवापर्यंत आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोल माफ

कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

यावेळी पंढरपूरला जाणाऱ्या गाड्या टोल फ्री केल्या जातील. जादाच्या ४ हजार ७०० एसटी सोडण्यात येतील. गरज लागल्यास आणखी एसटी बसेस सोडण्याच्या सूचना दिल्या जातील, असं शिंदेंनी सांगितलं. वारी यशस्वी होईल. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पांडुरंगाच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री म्हणून पूजा करण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण कुटुंब पांडुरंगाच्या पुजेला जाणार आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा