Farmers  Farmers
महाराष्ट्र

Farmers : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; खरडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ, मुरूम, कंकर मिळणार

राज्यात पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Farmers) राज्यात पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यातच आता पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, कंकर मोफत पुरवण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.

याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुरामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन पुन्हा लागवडी योग्य व सुपीक करण्यासाठी लागणाऱ्या माती, गाळ, मुरूम, कंकर या गौण खनिजांवरील स्वामित्वधन (रॉयल्टी) माफीच्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

या शासन निर्णयाच्या तात्काळ अंमलबजावणीचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा