महाराष्ट्र

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

Published by : Lokshahi News

रवी जैस्वाल, जालना
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्यानं घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे घडली आहे. रामभाऊ नारायण कदम असं या शेतकर्याचं नाव असून त्यांच्याकडे दीड एकर शेतजमीन आहे. शेतात यंदा ऊस आणि कपाशीची लागवड केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे जवळ असलेल्या गल्हाटी नदीला पूर येऊन पिकांसह शेतजमीनही खरडून गेली.

कदम हे काही दिवसांपासून नैराश्यात होते. त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेचं कर्ज असल्यानं ते फेडायचं कसं या विवंचनेत ते होते. त्यामुळे रात्री घरातील पत्र्याच्या गळफास घेवून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर