महाराष्ट्र

Bharat Bandh : शेतकरी संघटनांची आज भारत बंदची हाक

शेतकरी संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शेतकरी संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारविरोधात देशभरातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून आज शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

सकाळी 6 ते दुपारी 4 पर्यंत भारत बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. आज शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस आहे. शेतकऱ्यांनी वर्षभराआधी कृषी कायदे रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

गावातील दुकानं आणि ग्रामीण औद्योगिक व सेवा क्षेत्रातील संस्था बंद राहण्याची शक्यता आहे. भाजीपाला आणि इतर पिकांचा पुरवठा आणि खरेदी बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. धान्य बाजार, भाजी मंडई, शासकीय आणि निमसरकारी कार्यालये, ग्रामीण औद्योगिक व सेवा क्षेत्रातील संस्था आणि खाजगी क्षेत्रातील उद्योग बंद ठेवणार असल्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू