महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; कृषी अधिकारी सिरसाठ यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Published by : Lokshahi News

जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वदूर पाऊस झाला आहे . या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तसेच पावसामुळे पेरणीचे वेधदेखील शेतकऱ्यांना लागले आहे. पाऊस मान्सूनपूर्व असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये , असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

खरीप पेरणीसाठी समाधानकारक पाऊस पडल्यानंतर पेरणी करताना बीज प्रक्रिया करूनच शेतकऱ्यांनी लागवड किंवा पेरणी करावी , यासाठी कृषी विभागाच्या ग्रामपातळीवर काम करणारे कृषी सहायक , कृषी पर्यवेक्षक यांनी बहुतांश गावांमध्ये सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता प्रयोग केले आहेत . त्यानुसार शेतकऱ्यांनी करावे . विक्रीच्या बियाणांसाठीदेखील हा पर्याय अवलंबला गेला तर , उगवण क्षमतेनुसार पेरणी करता येईल. ७५-१०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी लागवड करू नये . कृषी विभागाच्या वतीने वेळोवेळी पेरणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. दुबार पेरणी टाळण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली जात असल्याची माहिती पैठण तालुका कृषी अधिकारी संदिप सिरसाठ यांनी दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज