महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये; कृषी अधिकारी सिरसाठ यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Published by : Lokshahi News

जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वदूर पाऊस झाला आहे . या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तसेच पावसामुळे पेरणीचे वेधदेखील शेतकऱ्यांना लागले आहे. पाऊस मान्सूनपूर्व असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये , असे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

खरीप पेरणीसाठी समाधानकारक पाऊस पडल्यानंतर पेरणी करताना बीज प्रक्रिया करूनच शेतकऱ्यांनी लागवड किंवा पेरणी करावी , यासाठी कृषी विभागाच्या ग्रामपातळीवर काम करणारे कृषी सहायक , कृषी पर्यवेक्षक यांनी बहुतांश गावांमध्ये सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता प्रयोग केले आहेत . त्यानुसार शेतकऱ्यांनी करावे . विक्रीच्या बियाणांसाठीदेखील हा पर्याय अवलंबला गेला तर , उगवण क्षमतेनुसार पेरणी करता येईल. ७५-१०० मिमी पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी लागवड करू नये . कृषी विभागाच्या वतीने वेळोवेळी पेरणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. दुबार पेरणी टाळण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून जनजागृती केली जात असल्याची माहिती पैठण तालुका कृषी अधिकारी संदिप सिरसाठ यांनी दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा