(Maharashtra Assembly Monsoon Session) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. हे अधिवेशन 30 जूनपासून18 जुलैपर्यंत असणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यावर आजही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार हे पाहणं महत्वाचे आहे.
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसातील नुकसानीबाबत सरकारचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले असून अनेक ठिकाणी नागरिकांचे देखील नुकसान झाले आहे
राज्यातील विकास कामे आणि निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत विरोधक सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती मिळत आहे. शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा आजही सभागृहात विरोधक उपस्थित करणार आहेत. त्यामुळे आज पाचव्या दिवशी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.