महाराष्ट्र

अंबरनाथमधील ‘त्या’ अपघातात पाचवा बळी

Published by : Lokshahi News

मयुरेश जाधव | अंबरनाथमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी घडली होती. या अपघातात आता पाचवा बळी गेला आहे. रिक्षात असलेल्या वलेचा कुटुंबातील १० वर्षीय चिमुकलीचाही ५ दिवसांनी अखेर मृत्यू झाला आहे.

रविवारी रात्री उल्हासनगरमधील वलेचा कुटुंबीय अंबरनाथच्या पालेगाव भागात रिक्षाने गणेश विसर्जनासाठी आलं होतं. यावेळी एका कारने त्यांच्या रिक्षेला दिलेल्या जोरदार धडकेत रिक्षेतील वर्षा वलेचा (५१), आरती वलेचा (४१) आणि राज वलेचा (१२) या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. तर तर रिक्षाचालक किसन शिंदे यांनाही या भीषण अपघातात प्राण गमवावे लागले होते. या अपघातात लहर वलेचा ही १० वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर गेले ५ दिवस उपचार सुरू होते. मात्र अखेर तिचाही उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं या अपघातातील मृतांची संख्या ५ वर गेली असून वलेचा कुटुंबातील मृतांची संख्या ४ वर गेली आहे.

दरम्यान, या अपघाताप्रकरणी कारचालक विनोद यादव याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. त्याला १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या अपघातानंतर उल्हासनगरमधील वलेचा कुटुंब मात्र पुरतं उध्वस्त झालं असून या बेदरकार कारचालकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जातेय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या