महाराष्ट्र

लग्नाला आलेल्या पाहुण्यांवर मधमाशांचा हल्ला; 50 जण गंभीर जखमी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय राठोड | यवतमाळ : येथे लग्नात मधमाशांनी हल्ला केला असून पन्नास जण गंभीर जखमी झाले. ही घटना नेर तालुक्यातील कामनदेवच्या मंदिरात घडली आहे. मधमाशांच्या हल्ल्यानंतर वधू-वरांकडील पाहुण्यांची एकच धावपळ उडाली आहे.

नेर तालुक्यातील कामनदेवच्या मंदिरात लग्न सुरु असतानाच मधमाशांनी हल्ला केल्याने पाहुण्याची एकच धावपळ झाली. काही पाहुण्यांनी जंगलाकडे धाव घेतली तर काहींनी नाल्याच्या पाण्यात उड्या मारल्या आहेत. यामध्ये अन्नाचीही मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याचे समजत आहे. दरम्यान, आग्या मधमाश्यांचा पोळावर कोणीतरी दगड मारल्याने ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. तर, जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

Rice Water: चमकदार त्वचेसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे जाणून घ्या...