महाराष्ट्र

पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग; प्रेक्षकांची तारांबळ

सवाई गंधर्व महोत्सवात आगीची घटना घडली आहे. कार्यक्रम सुरु असताना आग लागल्यानं प्रेक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : सवाई गंधर्व महोत्सवात आगीची घटना घडली आहे. कार्यक्रम सुरु असताना आग लागल्यानं प्रेक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आजचा या महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर येत आहे.

सवाई गंधर्व महोत्सवात आगीची घटना घडली आहे. पं. सुहास व्यास यांच्या गायन संपलं होतं. त्यानंतर काही वेळ ब्रेक होता. यादरम्यान ही आग लागल्याची माहिती आहे. कार्यक्रमाच्या मंडपाच्या मागील बाजूस फोटोगॅलरी असलेल्या ठिकाणी ही आग लागली आहे. यामुळे कार्यक्रमात प्रेक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मागे बसलेल्या प्रेक्षकांनी मंडपाच्या बाहेर धाव घेतली. मात्र फार मोठी आग नसल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यात आले आणि कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा