Haribhau Naik  Team Lokshahi
महाराष्ट्र

Haribhau Naik : ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचे निधन

नाईक यांच्या जाण्याने कामगार चळवळीतील एक लढवय्या नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Published by : Team Lokshahi

माजी कामगार राज्यमंत्री आणि ज्येष्ठ कामगार नेते राज्यमंत्री हरिभाऊ नाईक (Haribhau Naik) यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते ९४ वर्षांचे होते. हरिभाऊ नाईक यांनी नागपूर महानगरपालिकेच्या ( Nagpur Municipal Corporation) महापौरपदासह महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष, ILO जागतिक श्रम संघटनेचे भारताचे कामगार प्रतिनिधी, राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर आणि मुंबईचे अध्यक्ष तसंच विविध सामाजिक, राजकीय संघटनेचे प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे.

हरिभाऊ नाईक हे आपल्या नैतिक मूल्यांसाठी ओळखले जात. त्यांनी १९७१ मध्ये महापौर असताना काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या अपक्षाच्या गटातील उमेदवाराचा उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याने नैतिकता जपण्यासाठी महापौरपदाचा राजीनामा दिला होता. 'ज्या पक्षाचे व त्याला पाठिंबा देणाऱ्या गटाचे मी नेतृत्त्व करत आहे, त्याच गटातील उमेदवाराबाबत दगाफटका होत असेल तर सत्तेत राहण्याचा अधिकार उरत नाही म्हणून मी पाऊल उचललं' , अशी भूमिका त्यांनी घेतली होती. नाईक यांच्या जाण्याने कामगार चळवळीतील एक लढवय्या नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

कामगारांबद्दल आस्था असणारा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा देणारा नेता गमावल्याने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.नाईक यांनी मध्यरात्री १ वाजता आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. नाईक यांच्यावर आज सायंकाळी ४ वाजता मोक्षधाम, घाट रोड नागपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी