महाराष्ट्र

बैलगाडा घेऊन रस्त्यावर उतरणार; गिरीश महाजनांचा ठाकरे सरकारला इशारा

Published by : Lokshahi News

मंगेश जोशी, जळगाव | जळगावात आज माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपचे अनेक नेते उपस्थित झाले होते. यावेळी शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर ट्रॅक्टर बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा गिरीश महाजन यांनी राज्य सरकारला दिला.

जळगावात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतकरी आक्रोश मोर्चाला सूरूवात केली. या मोर्चात खासदार रक्षा खडसे खासदार उमेश उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे मंगेश चव्हाण संजय सावकारे यांच्यासह भाजपचे आजी माजी आमदार सहभागी झाले होते.

जळगाव जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत असून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र राज्य सरकारने अजून पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व मदत दिलेली नाही. शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे. या निषेधार्थ भाजपाचा वतीने शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे.

राज्य सरकारने फक्त शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे मात्र अद्याप पर्यंत एकही आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केले नसून राज्य सरकारने तात्काळ वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत केला नाही व शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर ट्रॅक्टर बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा गिरीश महाजन यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर