महाराष्ट्र

धानाच्या पुंजन्यला आग, आगीत संपूर्ण धान जळून खाक

Published by : Lokshahi News

उदय चक्रधर, गोंदीया
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील हरदोली गावात शेतकऱ्यांच्या धानाच्या पुजण्याला आज लागून संपूर्ण धन जळून खाक झाले आहे.

हरदोली येथील शंकर बिसने यांनी हलक्या वाणाची धान कापणी करून शेतातच पुंजना (ढीग) तयार करून ठेवला होता. गुरूवारी दुपारच्या सुमारास अचानक पुंजण्याला आग लागली. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण धान्य जळून खाक झाले. या मुळे शंकर यांना लाखो रुपयाचं नुकसान झाले असून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

सध्याची राज्यातली परिस्थीती शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना अशी आहे. परिणामी अतिवृष्टी, कर्जाचा डोंगर, सरकार आणि विमा कंपन्यांकडून दुर्लक्ष, या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक हेळसांड सहन करावी लागत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?