महाराष्ट्र

नागपूरमध्ये नागरिकांनी केली गुंडाची हत्या

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

नागपूर हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. नागपूरमध्ये नागरिकांनीच गुंडीची हत्या केली आहे. काल रात्री च्या सुमारास शांतीनगर मधील नारायण पेठ येथे ही हत्येची घटना घडली आहे. विजय वागधरे असे मृतक गुंडाचे नाव आहे.. मृतक विजय चे काल दुपार पासून सुनील नावाच्या व्यक्ती सोबत भांडण सुरू होते याची तक्रार देण्यासाठी सुनील पोलीस स्टेशन ला गेला, मात्र उपमुख्यमंत्री या परिसरात येणार असल्याने पोलीस बंदोबस्त तिकडे असल्याने पोलिसांनी विजय चा शोध घेतला नाही.

रात्री च्या सुमारास मृतक विजय ने सुनील च्या घरासमोर येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली.. गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त नागरिकांनी दगडाने ठेचून गुंडाची हत्या केली आहे. विजय हा त्याच्या साथीदारा सोबत हप्ता वसुली करायचा. त्याच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. याच परिसरात काल उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री प्रफुल्ल पटेल आणि इतर नेते यांचा कार्यक्रम होता. पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले असून बाकी आरोपींचा शोध घेणे सुरू आहे . विजयची हत्या ही अक्कू यादव हत्याकांडाची पुनरावृत्ती असल्याचे बोलले जाते.

लोकसभेत का जायचंय? बीडच्या सभेत पंकजा मुंडेंनी सांगितलं खरं कारण, म्हणाल्या; "खासदार झाल्यावर..."

Daily Horoscope 12 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे आर्थिक समस्या दूर होतील; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 12 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"कौरवांच्या विरोधात आमची पांडव सेना निवडणुकीच्या रिंगणात उतरले" पुण्यात उपमुख्यमंत्री फडणवीस कडाडले

GT vs CSK : शुबमन गिलच्या नावावर 'या' जबरदस्त विक्रमाची नोंद, अहमदाबादच्या मैदानात पाडला धावांचा पाऊस