महाराष्ट्र

राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान; 20 हजारांहून अधिक जागांसाठी मतदान

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात आज एकूण 2359 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान पार पडणार आहे. तर 2950 सदस्य निवडीसाठीही पोटनिवडणूक होणार आहे. 2489 सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. तसेच, 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठीही मतदान होणार आहे. तर 6 नोव्हेंबरला म्हणजेच उद्याच मतमोजणी पार पडणार आहे.

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका न्यायालयीन स्थगितीमुळे बऱ्याच काळापासून रखडल्या आहेत. याला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. मुंबईसह राज्यातील 25 महानगरपालिकांमध्ये प्रशासकीय राजवट आहे. या निवडणुका रखडल्या असल्या तरी ग्रामपंचायतींसाठी आजच मतदान होत आहे.

पुन्हा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाची टीम राज्यभर दौऱ्यावर

Hair Growth: केस गळतीमुळे त्रस्त आहात? एकदा नक्की वापरून पाहा 'हे' जादुई तेल...

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत झालेल्या गोंधळावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Mahayuti Sabha: आज महायुतीची जाहीरसभा! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर

Sanjay Raut : फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं