महाराष्ट्र

‘या’ जिल्ह्यातील ग्राम पंचायतींना मिळणार 5 लाखाचे बक्षीस

Published by : Lokshahi News

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, वर्धा प्रशासना तर्फे एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. लसीकरणासाठी सरकार तसेच प्रशासनाची धडपड तर दुसरीकडे नागरिकांची लसीसाठीची प्रतीक्षा पाहता बऱ्याच ठिकाणी लसीकरणाचा टक्का वाढताना दिसून येत नाही. त्यासाठीच वर्धा जिल्हा प्रशासनाने आता पुढाकार घेत लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक नाविन्यपूर्ण योजना समोर आणली आहे. लसीकरणासाठी पुढाकार घेत ग्रामपंचायत मधील संपूर्ण 100 टक्के लसीकरण पूर्ण करणाऱ्या ग्राम पंचायतीला 5 लाखाचे बक्षीस देण्याचे आवाहन केले आहे.

एकाच तालुक्यातून तीन ग्राम पंचायत यासाठी निवडण्यात येणार आहे. ज्या ग्राम पंचायत 100 टक्के लसीकरण पूर्ण करतील त्या ग्राम पंचायतीला 5 लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे. या अनोख्या उपक्रमाची चर्चा आता प्रशासनात जोर धरून आहे, या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी देखील ग्राम पंचायती पुढाकार घेतील अशी अपेक्षा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी व्यक्त केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Fort Of Maharashtra in UNESCO : अभिमानास्पद ! महाराष्ट्रातील 12 गड-किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत

Latest Marathi News Update live : महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना जागतिक यादीत स्थान

Digital Arrest Cyber Crime : विश्वास नांगरे-पाटील यांचा AI फोटो वापरून व्हिडिओ कॉल; तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक

Janasuraksha Bill : विरोधकांच्या सभात्यागानंतरही विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर