महाराष्ट्र

गोंदिया जिल्ह्यात गारपिटीचा पाऊस, रब्बी पिकांना बसणार फटका

Published by : Lokshahi News

उदय चक्रधर, गोंदिया | गोंदिया जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात गारांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे हिवाळ्यात अवकाळी पावसाने रब्बी पिकांना फटका बसणार आहे. तसेच थंडीचाही जोर वाढणार आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज सकाळपासूनच गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातवरण होते. आणि संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील घोगरा आणि जिल्ह्यातील इतर गावांत ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कडाक्याच्या थंडी नंतर मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडीचा जोर कमी झाला होता. त्यातच आता गारांसह पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. तर रब्बी धान पिकाचे नुकसान होणार आहे. सोबतच वातावरणाच्या बदलामुळे साथिचे रोग डोकेवर काढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू